अगदी सहजपणे जवळ आलो होतो,
तितक्याच सहजपणे दुरही झालोच ना.
फक्त तितक्या सहजपणे तुझ्या आठवणींपासून दूर नाही होता येत.
पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कारण असून रडतही नाही मी आजकाल.
पूर्वी सोबत चालताना वाटेचं भानच नसायचं,
आज एकट्या माझ्याकडे बघताना वाटेला कससच वाटतं.
स्वतःसाठी नव्हे मी तिला वाईट वाटायला नको म्हणून वाट टाळतो.
तू भेटण्या आधी गुलाबाचा गंधच कळला नाही,
तू गेल्यावर सुकलेलं गुलाबही जपून ठेवलंय.
सवय आहे मला,तुझ्या बाबतीतही मी असंच तर केलंय.
हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.
एकदा तू विसरलेला रुमाल आठवल्यावर आलेलीस घ्यायला,
मी हि तो छान घडी करून जपून ठेवला होता,
आता मला विसरलीयेस, स्वताला तसं जपणं कठीण आहे मला.
Wednesday, May 25, 2011
पोरगी एक पटवली
सकाळी सकाळी गेलो म्या बस थांब्या वरती
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती
इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान
लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला
जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्या त्या बघा गोरीच्या
दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक
पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत
म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल
कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो
गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर
तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन
मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!!
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती
इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान
लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला
जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्या त्या बघा गोरीच्या
दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक
पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत
म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल
कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो
गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर
तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन
मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!!
माझा एकटेपणा
कोणी सोबत नसल तरी,तरी तो माझ्या सोबत असतो,झालेच कधी दु:ख अनावर,तर येउन हलकेच अश्रु पुसतो .
कोणी नाही म्हणून काय झाले, "मी आहे ना " म्हणतो,कितीही जण असतील सोबत तरी,तोच एकटा मला जाणतो .
कधी आनंदाची उघडून कवाड, मी जाते दुस-यापाशी,पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .
मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ,सांग मला तुझा आनंद,माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .
कधी एखादा क्षण हळवा,भिजवतो डोळ्याची पापणी,ओघळले जरी लाख अश्रु,पुसाया नसते कोणी ,
मग परत जवळ येतो तो,माझे अश्रु वाटुन घेतो,शब्दानच्याही पलीकडचा आनंद,ओंजळीत माझ्या देऊन जातो.
कधी येतो खुप राग,पण हक्काच माणूस नसत काढायला,उधाणलेल्या त्या सगारामधून,मला किनारी आणून सोडायला .
पण अशा वेळी माझ्याबरोबर, खुप खोल तो येतो ,करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .
कधी चलबिचल होते मनाची,वाटते खुप अस्वस्थ,पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला,तो माझ्या जवळ येतो,झेलुनी दु:ख अंतरीचे,मला बोलकेपण तो देतो.
कधी ओथंबतात भावना,अन अडतात मनाच्या दारी,साचून राहतात तशाच मनी,जरी सोबत असतील सारी.
अशा वेळी त्याच्या मनाचे दार,तो माझ्यासाठी उघडतो ,मग मानून समाधान,मनाचा पारवा त्यातच बागड़तो .
वाटत असेल वाचताना,खरच कोण असेल तो ?एवढा सांभाळून घेणारा,खरच खुप गुणी दिसतो .
पण खरतर ह्या जगात,कोणीच कोणाच नसत,असेलच कोणी सोबत तर,केवळ मृगजळच असत.
म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची,खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा,आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "
आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.
लोकाना नको वाटतो एकटेपणा,पण तोच खरा सोबती,क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .
कितीही आली संकट, तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा,असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!
कोणी नाही म्हणून काय झाले, "मी आहे ना " म्हणतो,कितीही जण असतील सोबत तरी,तोच एकटा मला जाणतो .
कधी आनंदाची उघडून कवाड, मी जाते दुस-यापाशी,पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .
मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ,सांग मला तुझा आनंद,माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .
कधी एखादा क्षण हळवा,भिजवतो डोळ्याची पापणी,ओघळले जरी लाख अश्रु,पुसाया नसते कोणी ,
मग परत जवळ येतो तो,माझे अश्रु वाटुन घेतो,शब्दानच्याही पलीकडचा आनंद,ओंजळीत माझ्या देऊन जातो.
कधी येतो खुप राग,पण हक्काच माणूस नसत काढायला,उधाणलेल्या त्या सगारामधून,मला किनारी आणून सोडायला .
पण अशा वेळी माझ्याबरोबर, खुप खोल तो येतो ,करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .
कधी चलबिचल होते मनाची,वाटते खुप अस्वस्थ,पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला,तो माझ्या जवळ येतो,झेलुनी दु:ख अंतरीचे,मला बोलकेपण तो देतो.
कधी ओथंबतात भावना,अन अडतात मनाच्या दारी,साचून राहतात तशाच मनी,जरी सोबत असतील सारी.
अशा वेळी त्याच्या मनाचे दार,तो माझ्यासाठी उघडतो ,मग मानून समाधान,मनाचा पारवा त्यातच बागड़तो .
वाटत असेल वाचताना,खरच कोण असेल तो ?एवढा सांभाळून घेणारा,खरच खुप गुणी दिसतो .
पण खरतर ह्या जगात,कोणीच कोणाच नसत,असेलच कोणी सोबत तर,केवळ मृगजळच असत.
म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची,खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा,आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "
आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.
लोकाना नको वाटतो एकटेपणा,पण तोच खरा सोबती,क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .
कितीही आली संकट, तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा,असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!
Subscribe to:
Comments (Atom)
