Wednesday, May 25, 2011
अगदी सहजपणे जवळ आलो होतो
तितक्याच सहजपणे दुरही झालोच ना.
फक्त तितक्या सहजपणे तुझ्या आठवणींपासून दूर नाही होता येत.
पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कारण असून रडतही नाही मी आजकाल.
पूर्वी सोबत चालताना वाटेचं भानच नसायचं,
आज एकट्या माझ्याकडे बघताना वाटेला कससच वाटतं.
स्वतःसाठी नव्हे मी तिला वाईट वाटायला नको म्हणून वाट टाळतो.
तू भेटण्या आधी गुलाबाचा गंधच कळला नाही,
तू गेल्यावर सुकलेलं गुलाबही जपून ठेवलंय.
सवय आहे मला,तुझ्या बाबतीतही मी असंच तर केलंय.
हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.
एकदा तू विसरलेला रुमाल आठवल्यावर आलेलीस घ्यायला,
मी हि तो छान घडी करून जपून ठेवला होता,
आता मला विसरलीयेस, स्वताला तसं जपणं कठीण आहे मला.
पोरगी एक पटवली
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती
इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान
लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला
जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्या त्या बघा गोरीच्या
दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक
पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत
म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल
कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो
गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर
तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन
मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!!
माझा एकटेपणा
कोणी नाही म्हणून काय झाले, "मी आहे ना " म्हणतो,कितीही जण असतील सोबत तरी,तोच एकटा मला जाणतो .
कधी आनंदाची उघडून कवाड, मी जाते दुस-यापाशी,पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .
मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ,सांग मला तुझा आनंद,माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .
कधी एखादा क्षण हळवा,भिजवतो डोळ्याची पापणी,ओघळले जरी लाख अश्रु,पुसाया नसते कोणी ,
मग परत जवळ येतो तो,माझे अश्रु वाटुन घेतो,शब्दानच्याही पलीकडचा आनंद,ओंजळीत माझ्या देऊन जातो.
कधी येतो खुप राग,पण हक्काच माणूस नसत काढायला,उधाणलेल्या त्या सगारामधून,मला किनारी आणून सोडायला .
पण अशा वेळी माझ्याबरोबर, खुप खोल तो येतो ,करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .
कधी चलबिचल होते मनाची,वाटते खुप अस्वस्थ,पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला,तो माझ्या जवळ येतो,झेलुनी दु:ख अंतरीचे,मला बोलकेपण तो देतो.
कधी ओथंबतात भावना,अन अडतात मनाच्या दारी,साचून राहतात तशाच मनी,जरी सोबत असतील सारी.
अशा वेळी त्याच्या मनाचे दार,तो माझ्यासाठी उघडतो ,मग मानून समाधान,मनाचा पारवा त्यातच बागड़तो .
वाटत असेल वाचताना,खरच कोण असेल तो ?एवढा सांभाळून घेणारा,खरच खुप गुणी दिसतो .
पण खरतर ह्या जगात,कोणीच कोणाच नसत,असेलच कोणी सोबत तर,केवळ मृगजळच असत.
म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची,खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा,आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "
आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.
लोकाना नको वाटतो एकटेपणा,पण तोच खरा सोबती,क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .
कितीही आली संकट, तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा,असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!
Monday, March 1, 2010
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची
तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल
तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन
बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन
ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत
म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत
म्हणुनच बहुतेक ते कोणाला समजलं नव्हत
वळुन पाहिले प्रत्येक वळणावर
कधी तरी तुझी साद येईल...
ना वाटले कधी प्रेम तुझे
इतक्या लवकर कच खाईल...
ना केली मी पर्वा स्व:ताची ,
ना मला तमा या जगाची...
तुझ्या सहवासात आयुष्य जावं
हीच एक इच्छा मज वेडीची...
तु मात्र कधी जाणली नाहीस
किंम्मत त्या प्रेमाची...
मायेच्या नात्यांपुढे जळु दिलीस
स्वप्न आपल्या प्रीतीची..
सांभाळु ना शकलास तु
नात्यांचा हा डोलारा...
ना उरले हाती माझ्या काही,
विस्कटत गेला डाव सारा...
अजुनही वेड्यागत मी
तुझ्यावर प्रेम करते...
सहवासातले क्षण सोबतीला
आयुष्याची नाव हाकते..
जाणते आता कधीच न येणार
तुझी ती प्रेमळ साद...
पण शेवटच्या श्वासापर्यंत असेल
तुझ्या आठवणींशी संवाद...
एकदा ती माझ्याकडे आली
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर चल म्हणाली
हो म्हणायच्या आतच ती
देऊन हात.घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे. चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामध्ये भासे दीव्य एक रंगत
अनवट सूर बसुरीचा उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची
गालावर खळी नाजूक पडायची
नयन शिंपल्यात .जपावी वाटायची
तरुतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो
हात थरथरता तिच्या हातात
परी नजर थेट डोळ्यात
काय झाले पुढे सांगत नाही
स्वप्न सारे पुन्हा आठवायचे नाही
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी
प्रेमामध्ये तर पडलो नाही ?
