Pages

 

Tuesday, October 20, 2009

शेवटी तु मला विसरलीसच





शेवटी तु मला विसरलीसच
पण मी कसा विसरु तुला
कसा विसरु त्या जागवलेल्या रात्री
कशा विसरु त्या आगीच्या ज्वाळा
कशा विसरु त्या ह्रुदयातुन उठणाऱ्या कळा
प्रितीच्या बदल्यात प्रीत मी कधीच मागितली नव्हती
बस तु लग्नाला बोलावशील
अशी अपेक्षा मात्र मी केली होती
विश्वास ठेवला होता तुझ्यावर
पण तुही सामान्यच निघालीस
बस तुझ्या लग्नाला मी आलो असतो
कोपऱ्यात उभा राहुन डोळाभर पाहिलं असतं
लग्नानंतर पोटाला तडस
लागेपर्यंत जेवलो असतो
तुझ्या वरातीत
धुंद होउन नाचलो असतो.
पण तु मात्र माझ्यावरच संशय घेतलास
माझी प्रीत इतकी का कमजोर होती?
आता मी तुला विसरणार आहे
आज ना उद्या मी तुला विसरीन
आतापर्यंत मी स्वतःला
तुझ्या लायक समजत नव्हतो
आतामात्र मला कळून चुकलय
तुच लायक नाहीयेस माझ्या प्रीतीच्या
मी फ़क्त खाली पडलोय
मोडुन पडलो नाहीय
मी पुन्हा उभा राहीन
पण तुझ्यासाठी नाही
ज्याच्यांवर कविता तयार होतात
त्या व्यक्ती नशीबवान असतात
आज तु कमनशीबी ठरलीस
कारण ही कविता नाहीये
हे माझे अश्रू आहेत. शेवटचे अश्रू

No comments:

Post a Comment